🚨 ताज्या अपडेट्स

अहिल्यानगर CSC भरती 2026: आपले सरकार सेवा केंद्र भरती | Ahilyanagar CSC Bharti 2026

📅 प्रकाशित: August 27, 2026 | 📂 भरती
अहिल्यानगर CSC भरती 2026: आपले सरकार सेवा केंद्र भरती | Ahilyanagar CSC Bharti 2026

जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत Ahilyanagar CSC Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC) स्थापन करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. १२वी उत्तीर्ण असणाऱ्या आणि संगणकाचे ज्ञान असणाऱ्या स्थानिक रहिवासी उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

📋 जाहिरात सारांश
जाहिरात क्रमांक सेतु समिती/का.वि.45/2026
पदाचे नाव आपले सरकार सेवा केंद्र चालक / VLE (CSC Operator)
एकूण पदे 2430 पदे (ग्रामपंचायत: 2345, नगरपरिषद/पंचायत: 54, मनपा: 31)
शैक्षणिक पात्रता किमान 12वी (HSC) उत्तीर्ण व मूलभूत संगणक ज्ञान (MS-CIT/CCC)
वयोमर्यादा किमान 18 वर्षे पूर्ण
नोकरीचे ठिकाण अहिल्यानगर जिल्हा
अर्ज पद्धत ऑनलाईन
अर्ज शुल्क ₹100/- (सर्व प्रवर्ग)
अर्ज सुरु होण्याची तारीख 13 ऑगस्ट 2026
अर्ज शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत)
अधिकृत वेबसाईट अधिकृत वेबसाईटला भेट द्या

📌 थोडक्यात माहिती

  • संस्था: जिल्हाधिकारी कार्यालय / जिल्हा सेतु समिती, अहिल्यानगर
  • पदाचे नाव: आपले सरकार सेवा केंद्र संचालक (CSC VLE)
  • एकूण जागा: 2,430 पदे (स्थानिक ग्रामपंचायत, नगरपंचायत व महापालिका क्षेत्र)
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन पोर्टलमार्फत
  • निवड प्रक्रिया: अर्ज छाननी आणि गुण मूल्यमापन/लेखी परीक्षेद्वारे

📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

तारीख / टप्पा दिनांक
जाहिरात, अटी व शर्ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 12 ऑगस्ट 2026
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत 13 ऑगस्ट 2026 ते 12 सप्टेंबर 2026 (सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत)
प्राप्त अर्जांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे 16 सप्टेंबर 2026
छाननीअंती पात्र/अपात्र अर्जांची माहिती प्रसिद्ध करणे 30 सप्टेंबर 2026
पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे 12 ऑक्टोबर 2026
पात्र अर्जदारांची लेखी परीक्षा / मुलाखत संकेतस्थळावर सूचनापत्राद्वारे कळवण्यात येईल

📊 पात्रता आणि गुण मूल्यमापन पद्धत (Selection Criteria)

आपले सरकार सेवा केंद्र भरतीसाठी उमेदवारांचे मूल्यमापन खालील १०० गुणांच्या निकषांनुसार केले जाईल:

मूल्यमापन निकष गुण तपशील व आवश्यक कागदपत्रे
शैक्षणिक पात्रता 10 किमान HSC (12वी) उत्तीर्ण (5 गुण), पदवी असल्‍यास extra 2 गुण, पदव्युत्तर असल्‍यास extra 5 गुण.
संगणक व डिजिटल साक्षरता 15 MS-CIT किंवा CCC उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा सायबर सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र.
पायाभूत सुविधा 15 स्वतंत्र कार्यालय, संगणक, प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, सीसीटीव्ही (जिओ टॅग फोटोसह पुरावा).
आर्थिक क्षमता 10 सीए प्रमाणित नेटवर्थ प्रमाणपत्र किंवा बँकेचे ₹1.00 लाखाचे सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र.
ग्राहक सेवा व संवाद कौशल्य 20 संवाद कौशल्य व नागरिकाभिमुख दृष्टिकोन (लेखी परीक्षेद्वारे मूल्यांकन).
अनुभव 10 CSC, महा-ई-सेवा केंद्र, सायबर कॅफे किंवा बँक ग्राहक सेवा केंद्र चालवण्याचा अनुभव.
व्यवसाय आराखडा व शाश्वतता 05 पायाभूत सुविधा व अनुभवाच्या पुराव्यांवरून मूल्यांकन.
सामाजिक समावेशकता 05 दिव्यांग (40%+), माजी सैनिक, महिला किंवा स्वयंसहाय्यता गट (बचत गट) सदस्यांना प्राधान्य.
चारित्र्य पडताळणी 10 पोलीस विभागाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Clearance Certificate).
एकूण गुण 100

📝 अर्ज कसा करावा? (How to Apply)

  1. सर्वप्रथम अहिल्यानगर आपले सरकार पोर्टलच्या ऑनलाईन संकेतस्थळास भेट द्या.
  2. नवीन नोंदणी/अर्जाच्या पर्यायावर क्लिक करून तुमची मूलभूत माहिती भरा.
  3. अर्जदार ज्या गावातील किंवा प्रभागातील आहे, त्याच भागासाठी अर्ज करणे बंधनकारक आहे (स्थानिक रहिवास पुरावा जोडावा).
  4. आवश्यक कागदपत्रे जसे की १२वी गुणपत्रक, रहिवास दाखला, संगणक प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी दाखला व जिओ-टॅग केलेले फोटो अपलोड करा.
  5. ₹100/- इतके ऑनलाईन अर्ज शुल्क अदा करा (टीप: यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा शुल्क भरावे लागणार नाही).
  6. अर्ज पूर्ण भरल्यानंतर सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा व भविष्यातील संदर्भासाठी प्रत डाऊनलोड करून ठेवा.
📄 अधिकृत जाहिरात पहा (PDF)
✅ ऑनलाईन अर्ज करा
🌐 अधिकृत वेबसाईट

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अहिल्यानगर CSC भरती 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर २०२६ संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवार किमान HSC (१२वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आणि मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे?

सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१००/- आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केला आहे, त्यांना पुन्हा शुल्क भरावे लागणार नाही.

उमेदवाराची निवड प्रक्रिया कशी असेल?

जिल्हा सेतु समितीच्या निर्णयानुसार प्राप्त अर्जांची संख्या विचारात घेता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा / मूल्यमापन पद्धतीद्वारे अंतिम निवड केली जाईल.

एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करता येईल का?

नाही. एका अर्जदाराला केवळ एकाच ठिकाणी (आपल्या रहिवासी गावात/प्रभागात) अर्ज करता येईल. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील.

रहिवासाच्या पुराव्यासाठी कोणती कागदपत्रे चालतील?

ग्रामपंचायत दाखला, तहसीलदार रहिवास प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा मालमत्ता पत्रक (७/१२) यापैकी एक पुरावा ग्राह्य धरला जाईल.

⚠️ सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व संबधित पोर्टलवरील मार्गदर्शक सूचना सविस्तरपणे वाचून घेणे बंधनकारक आहे.

🚀 मोफत सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा!

आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा आणि सर्व अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवा.

🔗 संबंधित पोस्ट्स